Marathi Stotra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi Stotra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ मे, २०१६

Shri Ganapati Stotra in Marathi


Shri Ganapati Stotra  is the translation of the original Ganapati stotra in Sanskrit ,done by Shridhar Swami, originally written by Narad Muni.

These are 12 names of God Ganesh. It is said that if anybody recites this stotra daily for a year then he becomes master of all sidhies.

श्रीगणपती स्तोत्र
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका । 
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥
पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥
देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।             
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥


सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

Collection of Marathi Stotras

Manache Shlok




Shri Manache Shlok – these quatrains were composed by Samarth Ramdas Swami.Ramdas was a devotee of Hanuman and Rama.He is a spiritual poet of Maharashtra."Shri Manāche Shlok" advises ethical behavior and love for God, and a large volume, Dasbodh, provides advice on both spiritual and practical topics.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्री रामदासस्वामिंचे मनाचे श्लोक

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥

मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥

सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥

मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥

मना सांग पां रावणां काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १३ ॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥

मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥

मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥

मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥

मना सज्जना हीत माझे करावे ।
रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥

न बाले मना राघवेवीण काही ।
मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥

रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥

मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥

देहेरक्षणाकारणे यत्न केला ।
परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची ।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥

महासंकटी सोडिले देव जेणे ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥

अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥

उपेक्षी कदा रामरूपी असेना ।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥

असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥

मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥

बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥

बहुतांपरी हेचि आता धरावे ।
रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥

मना सज्जना एक जीवी धरावे ।
जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥

जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥

मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥

मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥

सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥

नसे अंतरी काम नानाविकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥

मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥

नसे मानसी नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥

जगी होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

नको वासना वीषयी वृत्तिरूपे ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला ।
अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥

मना राम कल्पतरू कालधेनू ।
निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥

उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा ।
पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥

निजध्यास तो सर्व तूटोनी गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला ।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥

नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥

नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥

घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥

बळे आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥

सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥

जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥

न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥

देहेदंडणेचे महादुःख आहे ।
महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥

बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥

समस्तांमधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥

करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥

मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥

मना मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिताही न साहे ॥ ८१ ॥

बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३ ॥

विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८६ ॥

बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥

न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥

नको वीट मानू रघूनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥

अती आदरे सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे ।
निशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२ ॥

जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥

तिन्ही कोप जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ॥
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥

मुखी नाम नीही तया मुक्ति कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहू तारिले मानवी देहधारी ॥
तया रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥

जगी धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥

यथासांग रे कर्म तेही घडेना ।
घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥
दया पाहता सर्व भूती असेना ।
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥

जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।
जना सज्जनालागि संतोषवावे ॥
देहे कारणी सर्व लावीत जावे ।
सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२ ॥

हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी ।
यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३ ॥

क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥
मना कल्पना धीट सैराट धावे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥

विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५ ॥

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभूती जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥

मना कोप आरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥

मना सर्वदा सज्जनाचेनि योगे ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगी तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे ।
विवेके अहंभाव याते जिणावे ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥

हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥
हिताकारणे बंड पाखांड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥

जनीं सांगता ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥

जनीं हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥

फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥

तुटे वाद संवाद तेथे करावा ।
विवेके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारखे आचरावे ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥

बहू शापिता कष्टला अंबऋषी ।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥

धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे ।
कृपा भाकिता दीघली भेटि जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥

गजेदू महासंकटी वास पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धावताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥

अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी ।
धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥
जना रक्षणाकारणे नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनि तयाकारणे सिंह जाला ॥
न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तया कारणे वामनू चक्रपाणी ॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥

अहल्येसतीलागी आरण्यपंथे ।
कुडावा पुढे देव बंदी तयाते ॥
बळे सोडिता घाव घाली निशाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२३ ॥

तये द्रौपदीकारणे लागवेगे ।
त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ॥
कळीलागि जाला असे बौद्ध मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥

अनाथां दिनींकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढे देव होणार आहे ॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥

जनांकारणे देव लीलावतारी ।
बहुतांपरी आदरे वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥

जगी धन्य तो राममूखे निवाला ।
कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७ ॥

मना वासना वासुदेवी वसो दे ।
मना वासना कामसंगी नसो दे ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥

गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥ १२९ ॥

मना अल्प संकल्प तोही नसावा ।
सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥

भजावा जनीं पाहता राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विनेकू ॥ १३१ ॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
बरे शोधल्यावीण बोलो नको हो ।
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥

हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी ।
जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शते पुण्य जोडे ।
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥

नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥

धरी रे मना संगती सज्जनीची ।
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्‍बुद्धि सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥

भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जया पाहता द्वैत काही दिसेना ।
भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥

भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले ।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आले ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥

पुढे पाहता सर्वही कोंदलेसे ।
अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥
अभावे कदा पुण्य गाठी पडेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥

जयाचे तया चूकले प्राप्त नाही ।
गुणे गोविले जाहले दुःख देही ॥
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

Mantra Pushpanjali


Mantra Pushpanjali (मंत्रपुष्पांजलि) is a popular prayer in Maharashtra, and it means “a prayer with an offering of flowers”. It comprises four hymns from Vedic sources, and is the final prayer sung at the end of Aartis.

During the Ganesh Festival, Mantra Pushpanjali is sung after the Aartis.Unlike the āratis and the bhajan, Mantrapushpanjali is not accompanied by clapping or by hand cymbals. Mantrapushpanjali is enunciated reverentially by devotees holding flowers in their palms. After the recitation, the flowers are offered to the Ganesh idol.


ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|
ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:
ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|
कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति

Meaning of Mantrapushpanjali 

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः || 1 ||

By means of sacrifice the Gods accomplished their sacrifice: these were the earliest ordinances. These Mighty Ones attained the height of heaven, there where the Sādhyas, Gods of old, are dwelling.

राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे | स मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु | कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः || 2 ||

We bow to Rājādhirāja Prasahyasāhī Vaiśravaṇa. May he, Kāmeshvara Vaiśravaṇa, grant me my desires for enjoyment of pleasures. [We] bow to Mahārāja Vaiśravaṇa Kubera.

साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति || 3 ||

... Universal sovereignty, enjoyment (of pleasures), independence, distinguished distinction as a king, the fulfilment of the highest desires, the position of a king, of a great king, and supreme mastership, that he might cross (with his arms) the universe, and become the ruler of the whole earth during all his life, which may last for an infinitely long time, that he might be the sole king of the earth up to its shores bordering on the ocean.

तदप्येषः श्लोको ऽभिगीतो | मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे | आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति ||4||
Regarding this event there is the following Stotra chanted: “The Maruts resided as the distributors of food in the house of Marutta, the son of Avikshit, who had fulfilled all his desires; all the gods were present at the gathering.”

Translation in English

Om yajnena yajnamayajanta devaastani dharmani prathamaanyaasan |
Te ha naakam mahimanah sachanta yatra purve sadhyahsanti devah ||
Om raajaadhiraajaaya prasahyasaahine | namo vayam vaishravanaaya kurmahe
Sa me kaamaan kaamakaamaaya mahyamkameshwaro vaishravano dadatu |
Kuberaya vaishravanaya mahaarajaaya namah |
Om swasti samrajyam bhoujyam swaraajyam
Vairaajyam paarameshthyam raajyam mahaaraajyamadahipatyamayam
Samaamtaparyaeesyat saarvabhoumah saarvaayusha aantaadaaparaardhat |
Pruthivyaisamudraparyantaayaa ekaraaliti | 
tadapyeshashloko bhigito marutah 
pariveshtaaro maruttasyaa vasan gruhe | avikshitasyakaamaprervishvedevaah sabhaasada iti |

बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

Morning Shlokas for kids


Hindu scriptures are written mostly in Sanskrit language. Compilation of Sanskrit words is known as ‘Shloka‘. Among all written Shlokas, some are regularly recited by Hindus. one we chanted during our school days as prayers, some are morning Shlokas. 

Early Morning is considered as the best time to worship God. Early morning is also known as "Brahma Mahurat" in the Hindu Mythology. It is regarded that prayers made at this time reach directly to the God. Early Morning Shloka is given here which also serves as the first prayer of the day to the almighty.

This shloka is to be recited in the morning. When you get up, just sit in the bed, don't rush out to get ready. Say this shloka with eyes still closed, and open them by the fourth part and see your hands and smile. 

Some even says there is science behind it, As per Practicalsanskrit.com,this exercise helps to stabilize your blood pressure. Aafter lying for 6-7 hours, you suddenly get up, there can be a pressure drop in the brain and this is known to be the most important factor in early morning strokes. Morning shlokas take about 1-2 minutes which is enough to get your brain used to new blood pressure.


कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती ।
करमूले स्थिता गौरी, मंगलं करदर्शनम् ॥

karAgre vasate lakShmI, kara-madhye saraswatI |
kara-moole sthitA gaurI, mangalaM* kara-darshanaM ||

Lakshmi in the finger tips, Saraswati on the palm |
Shakti is situated in the wrist, it is auspicious to see the Hands ||


मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

Gayatri Mantra , Meaning and Benefits


The Gayatri Mantra is one of the oldest and most powerful of Sanskrit mantras. The Gayatri Mantra was practiced for thousands of years.Going back 2,500 to 3,500 years,Vedas are some of the earliest scriptures.In Vedas, Gayatri Mantra is mentioned as Supreme Mantra.For many centuries, Gayatri was kept secret by Gurus and Yogis because of its power.Repetition of this Mantra will develop the Intelligence.

This Mantra has infinite potentiality.It is a vibrant formula.The Gavatri Mantra is addressed to the energy of the Sun, Surya. The Gayatri Mantra was discovered by Sage Viswamitra.The Gayatri Mantra enabled Sage Viswamitra to use rare weapons which bowed to his will when the Mantra was repeated with faith. Through the powers he attained in this way, Viswamitra was able to create a counterpart of this Cosmos. 

The Gayatri Mantra is the bestower of all that is beneficial to the person who chants it with faith. Almost all revered spiritual personals of India emphasized the power of  Gayatri mantra and suggested people to chant it.The Gayatri Mantra can be chanted at any time and everywhere.The significans and benefits , the way to chant it, meaning of Gayatri Mantra are detailed covered on Art of Living.com, Quora.com , the magic of gayatri.com and many more.

Chanting Gayatri Mantra's benefits seen in spiritual as well as physical body also. The information given on Gayatri Mantra Meditation site.Some of the benefits mentioned are as follows.

Removes obstacles from your life
Protects you from danger
Brightens your mind
Dispels ignorance
It is the reliever of diseases
Improves communication abilities
Opens your psychic vision
It is the fulfiller of all desires
Brings direct knowledge of the eternal truths

Infinite energy rests in the Gayatri mantra. - Sri Aurobindo

Gayatri is a mantra of righteous wisdom and therefore, it has been called a be-jeweled crown of all the mantras - Swami Vivekananda

"Of the many methods of yoga one of the most potent is the yoga of Gayatri mantra. Mantras have powers to endow one with remarkable abilities. The Gayatri mantra gives the devotees spiritual as well as material benefits." - Sri Ramana Maharshi

'Gayatri Mantra: Hymn to the Spirit Within the Fire', album is a humble effort to introduce the listener to what may be considered the ultimate spiritual journey of mankind. With this mantra you may experience divine bliss leading to spiritual ascent, in this world and beyond.Listeners have given many more good and best reviews for this CD.

It has been said that chanting the Gayatri mantra at least three times in the morning and evening bring great benefits spiritually and materially so, if you believe in the Vedas, you should not miss the great jewel of Vedas - The Gayatri mantra!

ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं ।
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥

Oṃ bhūr bhuvaḥ svaḥ
tát savitúr váreṇ(i)yaṃ
bhárgo devásya dhīmahi
dhíyo yó naḥ pracodáyāt

"We meditate upon the radiant Divine Light 
of that adorable Sun of Spiritual Consciousness; 
May it awaken our intuitional consciousness. "

Translation of Gayatri Mantra-Word by Word

Om!                  Brahma or Almighty God 
Bhuh                 embodiment of vital spiritual energy  (Pran)
bhuvah              destroyer of sufferings 
swah                 embodiment of happiness
tat                     that 
savituh              bright, luminous like the Sun  
varenyam          best, most exalted
bhargo              destroyer of sins  
devasya            divine
dhimahi            may imbibe
dhiyo                intellect
yo                    who 
nah                  our
prachodayat     may inspire

In short "it is a prayer to the Almighty Supreme God, the Creator of entire cosmos, the essence of our life existence, who removes all our pains and sufferings and grants happiness beseeching His divine grace to imbibe within us His Divinity and Brilliance which may purify us and guide our righteous wisdom on the right path"

Mantras do help to focus your mind on a desired outcome, to align you vibrationally with certain frequencies.'Shakti Mantras: Tapping into the Great Goddess Energy' ,by Thomas Ashley-Farrand.He was one of the Western world's foremost authorities on the application of Sanskrit Mantra to life's problems.

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

Ramraksha Stotra in Marathi



Ram Raksha Stotra (Sanskrit: श्रीरामरक्षास्तोत्रम्) is a Sanskrit stotra, hymn of praise, used as a prayer for protection to Lord Rama, it was written by a saint Budha Kaushika during the Vedic period. Literal meaning of Ram Raksha means 'Protection given by Lord Rama (to us)'. One who sincerely recites it and understands its meaning, he receives faith that Lord Rama protects his mind & prepares it to know the Ultimate Truth. It is said that Lord Shiva came into saint Budha Kaushika's dream and sung these stanzas.

॥ श्रीरामरक्षास्तोत्रम्‌ ॥

श्रीगणेशायनम: ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिक ऋषि: ।
श्रीसीतारामचंद्रोदेवता ।
अनुष्टुप्‌ छन्द: । सीता शक्ति: ।
श्रीमद्‌हनुमान्‌ कीलकम्‌ ।
श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥

॥ अथ ध्यानम्‌ ॥

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्‌मासनस्थं ।
पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ॥
वामाङ्‌कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।
नानालङ्‌कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम्‌ ॥

॥ इति ध्यानम्‌ ॥ 

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥१॥ 

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।
जानकीलक्ष्मणॊपेतं जटामुकुटमण्डितम्‌ ॥२॥ 

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्‌ ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥३॥

रामरक्षां पठॆत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥

जिव्हां विद्दानिधि: पातु कण्ठं भरतवंदित: ।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥

करौ सीतपति: पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥

सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु: ।
ऊरू रघुत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत्‌ ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जङ्‌घे दशमुखान्तक: ।
पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥

एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत्‌ ।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥१०॥

पातालभूतलव्योम चारिणश्छद्‌मचारिण: ।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥

रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्‌ ।
नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्‌ ।
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्द्दय: ॥१३॥

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥१४॥

आदिष्टवान्‌ यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर: ।
तथा लिखितवान्‌ प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥

आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्‌ ।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान्‌ स न: प्रभु: ॥१६॥

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥

फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥

शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।
रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ ॥१९॥

आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्‌ग सङि‌गनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम्‌ ॥२०॥

संनद्ध: कवची खड्‌गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्‌मनोरथोSस्माकं राम: पातु सलक्ष्मण: ॥२१॥

रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघुत्तम: ॥२२॥

वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम: ।
जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेय पराक्रम: ॥२३॥

इत्येतानि जपेन्नित्यं मद्‌भक्त: श्रद्धयान्वित: ।
अश्वमेधायुतं पुण्यं संप्राप्नोति न संशय: ॥२४॥

रामं दूर्वादलश्यामं पद्‌माक्षं पीतवाससम्‌ ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥

रामं लक्शमण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम्‌ ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ 
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम्‌ ।
वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥२६॥

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥ 

श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।
नान्यं जाने नैव जाने न जाने ॥३०॥

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम्‌ ॥३१॥

लोकाभिरामं रनरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्‌ ।
कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥३४॥

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्‌ ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥३५॥

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्‌ ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्‌ ॥३६॥

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥

इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्‌ ॥

॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

Maruti Stotra


http://www.amazon.com/gp/product/1594773378/ref=as_li_tl?ie=UTF8&camp=1789&creative=390957&creativeASIN=1594773378&linkCode=as2&tag=httppshinde2h-20&linkId=QC2UMVMR2LSLV3Y5
HANUMAN
Maruti Stotra is a 17th century stotra, composed in Marathi Language. It is believed that written by Saint 'Samarth Ramdas' in 17th century. It is a compilation of praiseful verses that describe the many aspects and virtues of Maruti or Hanuman.

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना   || १ ||
अर्थ :
हे हनुमंता, आपण भीमरूप , महारुद्र ,वज्र हनुमान , मारुती, वनाचे शत्रू, माता अंजनीचे पुत्र , प्रभू रामचंद्रांचे दूत आणि प्रभंजन आहात.

महाबळी प्राणदाता सकला उठवी बळे |
सौख्यकारी दुखहारी धूर्त वैष्णव गायका || २ ||
अर्थ:
हे हनुमंता , आपण महाबळी आणि प्राणदाता असून झोपलेल्यांना जबरदस्तीने उठवता .आपण लोकांना सुख देणारे असून लोकांच्या दुखाचे हान करणारे आहात .आपण धूर्त , विष्णुस्वरूप आणि उत्तम गाणारे आहात .

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा |
पातालदेवातहान्ता भव्यासिंदूर लेपना || ३ ||
अर्थ :
हे हनुमंता , आपण दिनानाथ , हरिरूप , अतिशय सुंदर असून सर्व जगताच्या अंतर्यामी आहात. अहिरावण आणि महिरावण या पाताळातील देवतांना आपण ठार केलेत. आपल्या सर्वांगाला शेंदूर लावल्यावर आपण भव्य दिसता.

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथ पुरातना |
पुण्यवंता पुण्याशीला पावना परितोषका || ४ ||
अर्थ :
हे हनुमंता , आपण लोकनाथ आहात , जगन्नाथ आहात आणि प्राणनाथ हि आहात.आपण पुण्यवंत , पुण्यशील आणि पवित्र असून भक्तांना तृप्त करता .

ध्वजांगे उचली बाहो , आवेशे लोटला पुढे |
कालाग्नी कालारुद्रग्नी देखता कापती भये || ५ ||
अर्थ:
रामचंद्रांचा विजयी ध्वज आपल्या हातात धरून आपण मोठ्या आवेशात सर्व सैन्याच्या पुढे निघालात . आपले हे रौद्र रूप पाहून कालाग्नी आणि कालारुद्रग्नी देखील आपण मरणार या भीतीने थरकाप कपू लागतात.


Listen maruti stotra online here:


ब्रम्हांडे माईलि नेणो आवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाला भृकुटी ताठील्या बळे || ६ ||
अर्थ :
हे हनुमंता , युद्धप्रसंगी रागाच्या भरात आपण जेव्हा दात-ओठ खाता तेव्हा सगळे ब्रम्हांड आपल्या मुखात मावेल असे वाटू लागते .क्रोधाने आपण आपल्या संतप्त नेत्रातून जणू तांबड्या ज्वाला बाहेर पडत असतात .

पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी |
सुवर्ण काटीकासोटी घंटा किंकिणी नागरा || ७ ||
अर्थ:
आपण आपली शेपटी व्यवस्थित वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली आहे . या शेपटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मस्तकावरील मुकुट आणि कानातील कुंडले शोभून दिसतात . आपल्या कमरेला सोन्याची कौपिन झळकते आहे, तर चरणांमध्ये असलेल्या नुपुरांमधील घंटा चालताना किणकिण वाजत असतात.


ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू |
चपलांग पाहता मोठे महाविदुलतेपरी ||८ ||
अर्थ:
हे हनुमंता , आपण मुळात सडपातळ असून आपले शरीरसौष्ठव प्रमाणबद्ध आहे . मात्र युद्धासमयी आपण जेव्हा विराट रूप धारण करतात तेव्हा एखादा पर्वतच समोर उभा ठाकला आहे असे वाटू लागते . एखाद्या विदुल्तेप्रमाणे आपले शरीर चपळ आहे .

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पतीला बाले ||९ ||
अर्थ :
आपल्या लीलाचारीत्रात आपल्या उड्डाणाचे असंख्य प्रसंग आहेत आणि नाना प्रकार आहेत . विशेषःत लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर आपण उत्तरेकडे झेपावालात तेव्हा रागाच्या भरात मंदाराचलासारखा द्रोणागिरी पर्वत आपण मुळासकट उपटून काढला तो प्रसंग मोठा विलक्षण म्हणावा लागेल .

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती |
मनासि टाकिले मागे , गतीसी तुलना नसे || १० ||
अर्थ :
आपले आश्चर्य हे कि , आपण लंकेत आणलेला द्रोणागिरी पर्वत परत उत्तरेकडे जागेवर नेऊन ठेवला .दोन वेळा आपण उत्तरेचा प्रवास मनाच्या चपळाईने केला. वस्तुतः ज्यांनी आपली गती मनाला मागे टाकणारी आहे . त्यामुळे आपल्या गतीशी तुलना करता येईल अशी एकही वस्तू जगात नाही.

अणूपासोनी ब्रम्हांडा एवढा होत जातसे |
तयासी तुलना कोठे मेरुमांदार धाकुटे || ११ ||
अर्थ :
हे हनुमंत , आपण अणूपासून ब्रम्हान्डाएवढे मोठे होत जाता . आपल्या या विशाल रुपाला तुलनाच नाही .विशालातेबद्दल प्रसिद्ध असलेले मेरू आणि मंदार हे पर्वत आपल्यापुढे चिमुकले वाटू लागतात .

ब्रम्हान्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके |
तयासी तुलना कैंची ब्रम्हांडी पाहता नसे || १२ ||
अर्थ :
हे हनुमंत , आपण वज्रपुच्छे एवढे लांब होऊ शकते कि , त्या द्वारे अवघ्या ब्रम्हांडाला गुंडाळता येईल. अशा परिस्थितीत संपूर्ण ब्रम्हांडात असा एकही पदार्थ शोधून सापडणार नाही , कि ज्याच्याशी आपल्या वाज्रपुच्छाची तुलना करता येईल.

आरक्त देखिले डोळा ग्रासिले सुर्यामंडला |
वाढता वाढता वाढे भेदिले शुण्यमंडला || १३ ||
अर्थ :
हे भगवंता , आपणास पाळण्यात ठेवून अंजनिमाता बाहेर गेली असता आपण आरक्तवर्ण सूर्यबिंब पाहिले. फळ समजून आपण ते गिळले . सूर्यबिंब गिळण्यासाठी आपल्याला खूप मोठे व्हावे लागते . मोठे होत असताना आपण वाढत वाढत सूर्यमंडळ ग्रासून टाकले.

धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही |
पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकारुनिया || १४ ||
टीप:हा श्लोक मूळ मारुती स्तोत्र मध्ये नाही.


भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही |
नासतीतुटती चिंता आनंदे भीमदर्शने ||१४ ||
अर्थ :
हे हनुमंता, आपल्या भव्य दर्शनाचा लाभ असा विलक्षण आहे कि त्या द्वारे सर्व शारीरिक आणि मानसिक आजर सर्व प्रकारची काळजी एवढेच नव्हे तर भूत , प्रेत, समंध यांच्याद्वारे होणारा त्रास कायमचा नाहीसा होऊन भक्ताला आनंदाची प्राप्ती होते.

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकलागुणे || १५ ||
अर्थ :
हे हनुमंता, हे पंधरा श्लोक म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा पंधरा कला आहेत .पंधरा श्लोकांद्वारे आपण केलेले हे स्तवन आम्हाला चांगले लाभदायी ठरले.त्यामुळे आमचे शरीर सुदृढ झाले आणि मन निशंक झाले.
.
रामदासी अग्रगण्यू कापिकुळासी मंडणू |
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नसती || १६ ||
अर्थ :
हे हनुमंता, समस्त रामभक्तांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात .आपल्यामुळे वानराकुळाला प्रतिष्ठा मिळाली . आपण रामस्वरूप असून सर्वांच्या अंतर्यामी आहात . आपल्या दर्शनाने समस्त दोषांचा परिहार होतो.

इति श्री रामदासकृतम् संकटनिरसनम् नाम मारुतीस्तोत्रम् संपूर्णम् ||
अर्थ :
अशाप्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटांचे निरसन करणारे हे मारुतिस्तोत्र येथे संपूर्ण झाले .

Quote Of the Day

You Are Not A Human On A Spiritual Journey.
You Are A Spirit On A Human Journey.
Pierre Teilhard de Chardin